व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत राबविण्यात येणार्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमामध्ये घराघरांवर तीन दिवस अहोरात्र तिरंगा फडकणार आहे.
यासंदर्भातील नियमावलीही शासनाने जाहीर केली आहे.
शासनाच्या वतीने 11 ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा उपक्रम जाहीर करण्यात आला होता.पण अत्ता13 ते 15 ऑगस्टपर्यंत नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. तिरंगा फडकविण्याच्या आणि तो उतरविण्याच्या वेळा निश्चित असतात. त्याचवेळी तो उतरावयाचा असतो.
परंतु सर्वच नागरिकांना नियमावलीची किंवा ध्वज संहितेबद्दल माहिती असेलच असे नाही. त्यामुळे उपक्रमाच्या कालावधीमध्ये बदल करण्यात आला आहे. दि. 11 ऐवजी आता 13 ऑगस्ट रोजी नागरिकांंनी आपल्या घरावर तिरंगा लावायचा आहे. तो रात्री न उतरवता तसाच तीन दिवस म्हणजे 15 पर्यंत ठेवण्यास परवानगी दिली आहे. 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी हा ध्वज उतरावयाचा आहे.
विश्व श्रीराम सेना राष्ट्रीय अध्यक्ष डॉ लालबाबु गुप्ता यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे, या उद्देशाने केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने दि. 13 ते दि. 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये देशभरात “हर घर झेंडा” म्हणजेच ‘घरो घरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
हर घर झेंडा’ अर्थात ‘घरो घरी तिरंगा’ अभियान यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग घेण्यात येत आहे. आपल्यामधील असलेले राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम या अभियानाअंतर्गत होणार आहे.
घरो घरी तिरंगा’ या अभियानाअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान देशातील सुमारे 20 कोटी घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार असून संपूर्ण देश भारतमातेच्या सेवेत समर्पित असल्याचा एक संदेश आपण जगाला देणार आहोत, अशा शब्दांत डॉ गुप्ता यांनीही या अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.
Discussion about this post