व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:दि.२८ आळंदी पालिका हद्दीतील गावठाणातील
भागीरथी कुंड बरेच वर्ष दुरवस्थेत होते.त्याला पुनरुज्जीवन देण्याचे काम २०१८ मध्ये झाले. त्यावेळेस पुण्यातील अखिल विश्व गायत्री परिषद ,जलदेवता सेवा संघ आळंदीतील इंद्रायणी नमामि प्रतिष्ठान यांच्या वतीने या कुंडातील गाळ काढण्यात आला होता.
तेथील साफ सफाई झाली होती.या पवित्र कुंडात नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी कुंडाच्या बाजूने संरक्षण भिंत करून त्यावर लोखंडी जाळीचे ही काम करण्यात आले होते.लोक सहभागातून ते काम पूर्ण करण्यात आले होते.त्यावेळेस त्या सेवाभावी संस्थांनी ते सांगितले होते.
आळंदीत उन्हाळ्यात १९८७ ते १९९४ पर्यंत इंद्रायणी नदी कोरडी पडली की पाणीटंचाई स्थिती निर्माण होत असत.तेव्हा प्रदक्षिणा रस्त्यावरील फ्रुटवाला धर्मशाळेतील विहीर व या कुंडातील पाण्याचा आधार लोक घेत असत.
आता चार वर्षानंतर पुन्हा पवित्र भागीरथी कुंडाला पुनरुज्जीवन देण्याचे काम सुरू झाले.
गेली चार वर्षे त्या कुंडा कडे दुर्लक्षतेच्या कारणामुळे पुन्हा तेथील अस्वच्छतेच्या कारणाने गाळ निर्माण झाला होता.भविष्यात मोठया प्रमाणात गाळ साचून त्या कुंडातील जलस्रोत बंद होऊ नये.या कारणा मुळे पुन्हा या भागीरथी कुंडातील गाळ काढून त्याला पुनरुज्जीवन देण्याचे काम पुन्हा सेवाभावी संस्था आणि व्यक्ती यांच्या पाठपुराव्याने
आळंदी नगरपरिषदेने हाती घेतले आहे.
अखिल विश्व गायत्री परिवार,जलदेवता संघ,जनहीत फाउंडेशन, इ.सेवा संस्थाचा या कामात परिश्रम पूर्वक सहभाग आहे. वारंवार कुंड अस्वच्छतेमुळे घाण होऊ नये व घाण जाऊ नये याकरिता कुंडातील पाणी उपसा करून सध्या त्या कुंडात
सिमेंट कॉक्रीटीकरण करण्याचे काम चालू असल्याचे दिसत आहे.तेथील खाली एका बाजूला रस्त्याचा भाग खचल्याचे दिसून आले. त्याची ही दुरुस्ती केली जाणार आहे.
कामपूर्ण झाल्यानंतर भविष्यात वेळोवेळी पालिकेचे सेवाभावी संस्थेचे व पाठपुरावा करणारे व्यक्तींचे या भागीरथी कुंडाकडे स्वच्छतेसाठी लक्ष राहणार का? की पुन्हा काही वर्षानंतर ते कुंड पुनरुज्जीवन करण्यासाठी स्वच्छता करावी लागणार हे प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित येथे राहत आहेत.
नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे या परिसरात कचरा व अस्वच्छता करू नये.तेथील परिसर स्वच्छ राहण्या करीता तेथील नागरिकांनी कचरा नेहमी घंडागाडीत टाकावा.असे आवाहन पालिके तर्फे करण्यात आले आहे.हे पुरातन कुंड जतन संवर्धन करणार असे पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी यांनी सांगितले याचे वृत्त ही प्रसारित झाले आहे.
Discussion about this post