व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-पुणे शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येचा विचार करता पुण्याचे विभाजन करून दोन महापालिकांची आवश्यकता आहे, अशी भूमिका राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली. दिल्लीमध्ये मात्र तीन महापालिकांचे विलीनीकरण करून एकच महापालिका करण्यात आली आहे.
त्यासाठीही भारतीय जनता पक्षच आग्रही होता. प्रशासकीय सोयीसाठी सत्तेचे विकेंद्रीकरण आवश्यक असते मात्र त्यासाठी एकच काहीतरी भूमिका असली पाहिजे. इथं मात्र पक्षाच्या सोयीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका मांडली जात आहे. यात जनतेचे हित प्रशासनाची सोयकुठेही दिसत नाही, तर काहीही करून सत्ता मिळवण्यासाठी सर्व चांगल्या गोष्टींची मोडतोड करायची हे धोरण दिसते. त्यातूनच वार्डांची संख्या बदलणं, वॉर्ड रचना बदलणे अशा गोष्टी केल्या जातात. दिल्लीत महापालिकांचे विलीनीकरण करण्याच्या नावाखाली निवडणूक प्रलंबित ठेवण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातही घडताना दिसत आहे. वेगवेगळ्या कारणांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलून घटनेमध्ये करण्यात आलेल्या ७३ व्या आणि ७४ व्या दुरुस्तीची वाट लावली जात आहे आहे. हा सगळा प्रकार सत्तेची सूत्र स्वतःकडे ठेवण्यासाठी चाललेला आहे. परंतु जनता हे फार काळ सहन करणार नाही. असे आप राज्य संघटक
विजय कुंभार यांनी म्हटले.
पुण्याचे दोन भाग करण्याची माझी राजकीय भूमिका नाही. मात्र विकास आणि बाकी समस्या बघितल्या तर दोन भाग व्हायला हवेत असं मला वाटतं. जेवढा परिसरत किंवा युनिट जितके लहान असेल तितकं काम करायला सोपं जातं, समस्या नीट सोडवता येतात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे लहान क्षेत्रफळात जास्त चांगला विकास होऊ शकतो, असंदेखील ते म्हणाले.
गेल्या काही वर्षात पुणे महापालिकेत 23 नव्या गावांचा समावेश झाली आणि त्यानंतर 11 गावं समाविष्ट झाली होती. त्यामुळे एकूण 34 गावं पुणे महापालिकेत समाविष्ठ झाली. त्यानंतर पुणे महापालिका भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठी महापालिका झाली आहे. त्यामुळे शहरात अनेक वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. वाहतूक कोंडी, पाणी, चांदणी चौकातील वाहतूक कोंडी यावर सातत्याने चंद्रकांत पाटील यांना अनेकदा प्रश्न विचारले गेले. मागील काही वर्ष त्यांनी या शहरातील विकास कामांवर भर दिला. विकास काम करायची असेल तर महापालिकेचं क्षेत्राच्या विकासासाठी दोन भाग व्हायला हवेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पुणे जिल्ह्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा दोन महापालिका आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानुसार जर पुणे महापालिकेचे दोन भाग झाले तर एकट्या पुण्यात तिसरी महापालिका जन्माला येईल.
Discussion about this post