व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक दिवसापासून शहराला कमी प्रेशरने (दाबाने) पाणीपुरवठा होत आहे.
त्यामध्येच निगडी प्रभाग क्रमांक 13, यमुनानगर, निगडी, साईनाथ नगर, सेक्टर 22, या भागामध्ये गेले एक महिन्यापासून पाणीपुरवठा कमी प्रेशरने होत आहे,
पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी तक्रार देऊन सुद्धा, पाणीपुरवठा व्यवस्थित केला जात नाही, आपल्याच भागातील पाणी दुसऱ्या भागाला वळवल्यामुळे निगडी यमुना नगर सेक्टर 22 या भागात पाणी नागरिकांना मिळत नाही, वेळोवेळी प्रशासनाला पाणीपुरवठा विभागाला तक्रार देऊन सुद्धा, दखल घेतली जात नाही.
म्हणून आज जनसंवाद सभेमध्ये जाऊन प्रत्येक अधिकारी यांना चाय बिस्किट स्वतःच्या हाताने खायला घातले, व निगरगट प्रशासनाला सांगण्यात आले की वार्डात माता भगिनींना खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा त्रास होत आहे पाणीपुरवठा सुरळीत करा.
पुढे सात दिवसाचा टाईम पाणीपुरवठा विभागाला देण्यात आलेला आहे अन्यथा अजून तीव्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल अशी तंबी आज सचिन चिखले – मनसे शहराध्यक्ष यांनी प्रशासनाला दिली.
Discussion about this post