व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती आळंदीत साजरी करण्यात आली.
कोरोनाच्या निर्बंधांमुळे दोन वर्षे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करता आली नाही.या भयंकर विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊनसारख्या परिस्थितीमुळे सगळ्यात सण-उत्सवांवर विरजण पडले होते. गेल्या दोन वर्षात १४ एप्रिल अर्थात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरच्या घरीच साजरी करण्यात आली होती. दरवर्षी जल्लोषात,धुमधडाक्यात सार्वजनिक रित्या साजऱ्या होणाऱ्या या वार्षिक आनंदोत्सवावर करोनाचं सावट आलं होतं. मात्र या वर्षी करोनाचं संकट ओसरलं असल्यानं तब्बल दोन वर्षानंतर यंदाची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पहिल्यासारखीच जल्लोषात आळंदीत साजरी करण्यात आली. नगरपरिषदेत नगरपरिषदेचे आधिकारी वर्ग ,कर्मचारी,नागरिक तसेच पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी,पोलीस कर्मचारी व ,दक्षता फाउंडेशन,दक्षता सेवा फौंडेशन यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.आळंदी युथ सोशल फाउंडेशन,आळंदी शहर भारतीय जनता पक्ष विविध
संस्थेनी ही जयंती साजरी करून त्यांना अभिवादन केले.विहाराची रंगरंगोटी ही करण्यात आली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त रात्री सिद्धार्थ ग्रुप आयोजित भव्य मिरवणूक ही काढण्यात आली.त्यात डिजिटल सिस्टीम व आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली होती. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,भारतीय संविधान असे दोन आकर्षक चित्ररथ आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.भारतीय संविधान चित्ररथातील कलम का बादशाह,
धर्म स्वातंत्र्य, कामगार अधिकार,शिक्षण,मतदान,
स्त्रीसशक्तीकरण अशी वाक्य लोकांचे लक्ष वेधत होती.
हजारो नागरिकांनी हा चित्ररथ व मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती तसेच अनेक सहभागी ही झाले होते.तसेच राष्ट्रवादी चे खेड-आळंदी मतदार संघाचे आमदार दिलीप मोहिते यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत व अभिवादन करत उत्सवात सहभागी झाले होते.
Discussion about this post