व्हीएसआरएस मराठी न्युज -वेगाने वाहन चालवले म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दंड भरला, तसाच दंड मीही भरला आहे. अगोदर रस्ते चांगले नव्हते. वाहने पळत नव्हती.
पण आता वाहने आणि रस्तेही चांगले आहेत.
त्यामुळे वाहनांचा वेग वाढतो. मात्र आता वाहनांना वेग मर्यादा बंधनकारक केली आहेे. ही मर्यादा वाढवण्याची गरज आहे. नाही तर वाहतूक नियमांच्या दंडामुळे घर-दार विकायची वेळ येईल, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. भाजपचा अजेंडा चालवून कोणाचे अस्तित्व धोक्यात येणार नाही.
Discussion about this post