व्हीएसआरएस मराठी न्युज -खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान प्रस्तावित 28 किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या अहवालास राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने हिरवा कंदील दर्शविला आहे.त्यामुळे प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने आणखी एक टप्पा पार झाला आहे.
मार्च ते मे या तीन महिन्यांत कडक उन्हाळा असतो. या तीन महिन्यांच्या कालवधीत कालवा आणि धरणातील पाण्याचे बाष्पीभवन, उन्हाळी आवर्तनामुळे आणि गळतीमुळे जवळपास 2. 8 अब्ज घनफूट पाणी वाया जाते. ते खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान बोगद्यातून नेल्यास त्यामध्ये बचत होऊ शकते.
पावसाळा लांबला तरी बचत झालेल्या या पाण्याच्या मदतीने जुलैअखेरपर्यंत पाणीटंचाईचा सामना करता येऊ शकतो, त्यादृष्टीने हा प्रकल्प शहरासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पांतर्गत खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान 28 किलोमीटर लांबीचा बोगदा प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी निविदा काढून काम देण्यात आले होते. संबंधित कंपनीकडून याबाबतचा अहवाल तांत्रिक जलसंपदा विभागाकडून तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला होता. या समितीने मध्यंतरी त्या अहवालात किरकोळ त्रुटी काढल्या होत्या.
खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याच्या प्रस्तावास राज्य तांत्रिक सल्लागार समितीने मान्यता दिली आहे. आता तो राज्य सरकारकडे प्रशासकीय मान्यतेसाठी जाणार आहे. मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
Discussion about this post