व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –‘हर घर तिरंगा’ अभियानाचा प्रारंभ क्रांतीदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी आज रविवारी आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमो सरचिटणीस दिनेश यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयात भोसरी विधानसभा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यात विविध सूचना देत सर्वांशी संवाद साधण्यात आला.
शासनाच्या वतीने 11 ते 17 ऑगस्ट हर घर तिरंगा उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 11 ते 17 ऑगस्टपर्यंत नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. तिरंगा फडकविण्याच्या आणि तो उतरविण्याच्या वेळा निश्चित असतात. त्याचवेळी तो उतरावयाचा असतो.
परंतु सर्वच नागरिकांना नियमावलीची किंवा ध्वज संहितेबद्दल माहिती असेलच असे नाही. त्यामुळे उपक्रमाच्या कालावधीमध्ये बदल करण्यात आला आहे. दि. 11 ऐवजी आता 13 ऑगस्ट रोजी नागरिकांंनी आपल्या घरावर तिरंगा लावायचा आहे. तो रात्री न उतरवता तसाच तीन दिवस म्हणजे 15 पर्यंत ठेवण्यास परवानगी दिली आहे. 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी हा ध्वज उतरावयाचा आहे.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेविका वैशाली खाडे, अमित गुप्ता, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंंधे, उदय गायकवाड, शिवराज लांडगे, राजेश डोंगरे जयदिप कर्पे, पंकज शर्मा, विक्रांत गंगावणे, प्रकाश चौधरी, अतुल सोनकांबळे, दिपक घन, शाम थोरात, स्वराज पिंजण, मनोज मोरे, विलास यादव, आकाश रोकडे, राहुल तापकीर, मिलींद रोकडे, अमित महाडीक, दत्तात्रय वाळके, मनोज मापारी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post