व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -राज्य सरकारने निवडणुकीसाठी केलेला कायदा न्यायालयात टिकला नाही तर निवडणुका लगेचच होऊ शकतात. निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीनेच होणार आहेत. त्यामुळे गाफील राहू नका, कामाला लागा असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
पुणे येथील एका उद्घाटनाच्या कार्यक्रमात अजित पवार म्हणाले की, ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. यासाठी राज्य सरकारने एकमताने कायदा तयार केला. त्या अध्यादेशावर राज्यपालांनी देखील स्वाक्षरी केली आहे. परंतु हा कायदा उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही तर राज्य निवडणूक आयोग केंव्हाही महापालिकांच्या निवडणूक जाहीर करू शकते. तसेच आगामी निवडणुक त्रिसदसिय पद्धतीनेच होईल, यामुळे कामाला लागा असे ही पवार यांनी स्पष्ट केले. निवडणुका पुढे जाणार असे समजून अनेक इच्छुक थंड पडले होते. तर पुन्हा एकदा २ सदस्यीय प्रभाग रचना होणार अशी चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे निवडणुका कधी होणार? प्रभाग कसा पडणार? प्रभाग किती सदस्यांचा होणार? हि चर्चा चौकाचौकात रंगत आहे. खुद्द इच्छुक उमेदवार, कार्यकर्त्यांसह पुढारी देखील संभ्रमात आहेत. परंतु आज अजित पवार यांनी केलेल्या सूचक विधानामुळे नॉट रिचेबल झालेले ,
इच्छुक पुन्हा एकदा चार्ज झाले आहेत. मुळात न्यायालयाने देखील निवडणुका घेण्याबाबत यापूर्वीच सकारात्मक भूमिका दाखविलेली आहे. पुन्हा एकदा निवडणुकांचा चेंडू न्यायालयात आहे. त्यात आजचे अजित पवारांचे विधान, या सर्व बाबींचा विचार केला तर निवडणुका केव्हाही म्हणजे मे महिन्यात होवू शकतील असा देखील अंदाज राजकीय जाणकारांनी लावला आहे. त्यामुळे इच्छुकांनी गाफील राहुल चालणार नाही हे मात्र नक्की.
Discussion about this post