व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी नाना पटोले आले होते. यावेळी ते बोलत होते.
नाना पटोले म्हणाले, पिंपरी-चिंचवडमध्ये कॉंग्रेस कोणामागे फरफटत जाणार नाही. एखाद्या पक्षाकडून आघाडीबाबत प्रस्ताव आला तर चर्चा झाली करू. परंतु, इतर पक्षांनी त्यांची भूमिका आधीच स्पष्ट केल्याने तो प्रश्न मिटल्याचं अप्रत्यक्षपणे पटोलेंनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत काँग्रेस आघाडी करणार नाही, हे जवळपास स्पष्ट झालंय. पिंपरी आणि पुण्यात काँग्रेसला नवी पालवी देण्याचे काम सुरू असल्याचंही नाना पटोले यावेळी म्हणाले.
पुण्यात पक्षाचा परंपरागत मतदार आहे. मात्र, संघटना कमकुवत आहे. गेल्या दहा वर्षात विविध गटा-तटात विभागलेली कॉंग्रेस एकरूप होण्यासाठी जे नेतृत्व लागतं ते नेतृत्व दुर्देवाने पक्षाकडे नाही. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या शहराकडे राज्य पातळीवरील नेतृत्वाचे लक्ष नाही हे गेल्या दहा वर्षात स्पष्ट झाले आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासारख्यांकडे शहराचे नेतृत्व दिले तर शहरातील संघटनेला चालना मिळेल.गटातटाच्या राजकारणातून कॉंग्रेस मुक्त होईल.मात्र, हे करण्यासाठी या नेत्यांची आणि राज्य पातळीवरील पक्षाच्या नेतृत्वाची इच्छाशक्ती नाही की काय अशीच सध्याची स्थिती आहे.
राज्यातील 15 महानरपालिकांच्या निवडणुका येत्या काही दिवसांमध्ये होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत.
Discussion about this post