व्हीएसआरएस मराठी न्युज -नद्यांवरील २८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राजाराम बंधाऱ्यावर ३० फूट पाणी आहे, तर राधानगरी धरणातून ११०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात अजूनही पावसाची रिपरिप सुरुच आहे.
धरण क्षेत्रात पावसाने मुसळधार सुरुवात केली आहे, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच एनडीआरएफच्या देन तुकड्या कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत.
राज्यात काल (मंगळवार) पासून मुसळधार पावसाने (Rain) सुरुवात केली आहे. हवामान विभागाने मुंबईत ९ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. देशातील सर्वच राज्यांत मान्सून सक्रीय झाला आहे. ५, ८ आणि ९ जुलै रोजी तेलंगणातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर आज सकाळी मुंबईत पावसाने थोडी विश्रांती घेतली होती, पण नवी मुंबईत सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे.
Discussion about this post