व्हीएसआरएस मराठी न्युज मोशी- डॉ लालबाबु गुप्ता यांच्या मार्गदर्शन खाली दि.१५ रोजी मोशी इंद्रायणी नदी घाट स्वच्छता मोहीम राविण्यात आली.
विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथील इंद्रायणी नदी तीरावर उत्तर भारतीयांच्या छट पूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त तेथे हजारो भाविक उपस्थित राहतात.
सध्या इंद्रायणी नदीत खूप कचरा व गाळ साचून पाणी व परिसर अस्वच्छ झाला आहे. छटपूजेच्या निमित्ताने विश्व श्रीराम सेनेच्या वतीने नदी स्वच्छता अभियान राबविले. दसरा, दिवाळीच्या काळात नदीत पडलेला कचरा, फुलांचे हार, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, काचा, जुनी कपडे, गोधड्या, गोणी, धर्माकॉल, शेवाळ, मूल्य, लाकडी मंदिरे, काठ्या, प्लेट, ग्लास, नारळ, फळे, आपट्याची पाने, गाळ आदी कचरा काढून नदीतील पाणी व सभोतालचा परिसर चकचकीत करण्यात आला.
या वेळी विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष डॉ लालबाबू गुप्ता म्हणाले की, सूर्याची उपसना करणारे व्रत म्हणजे छटपूजा. मानवाच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी ही छटपूजा अल्याचे प्राचिन काळापासूनची सामाजिक धारणा आहे. ही छटपूजा शनिवारी (दि.१७ रोजी असल्याने तिचे विशेष महत्त्व आहे.
निसर्गात आणि समाजात एकरूपता साधणाऱ्या या व्रतात, आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरण प्रति समर्पणाची भावना आहे. यामूळे येथे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नदी स्वच्छता अभियान घेण्यात आले. या वेळी महापालिका आरोग्य विभागाचे, स्थापत्य विभागाचे कर्मचारी. विश्व श्रीराम सेना पर्यावरण मंच,आरोग्य मंचाचे अक्रम शेख, विश्व श्रीराम सेनेचे प्रमोद गुप्ता, धनंजय गुप्ता, रामचरण सिंह, झोंबी सिंग, विनोद गुप्ता, मुन्ना प्रसाद, रोहित कुंभार, रोहीत प्रसाद, देवेंद्र प्रसाद, शामबाबू गुप्ता आदी उपस्थित होते.
Discussion about this post