व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:दि.१७ आषाढी वारीला अवघा एक महिना राहिला असून आळंदीत इंद्रायणी नदी पुन्हा एकदा रासायनिक सांडपाण्यामुळे फेसाळलेली दिसून येत आहे.
आळंदीत मागील महिन्यात ही, इंद्रायणी नदीची हीच अवस्था झाली होती.
इंद्रायणी नदीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून व इंद्रायणी नदी काठावरच्या गावातून मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्याने नदीपात्र प्रदूषित झाले आहे.त्यामुळे जलचर प्राणी(मासे) ही मृत अवस्थेत आढळून आले होते.
आळंदीत आषाढी वारीसाठी राज्यभरातून अनेक भाविक माऊलींच्या दर्शनासाठी व पायी सोहळ्यासाठी येत असतात. पवित्र अश्या इंद्रायणी नदीत आलेले भाविक स्नान ही करतात .सध्या पवित्र अशी इंद्रायणी नदी वारंवार प्रदुषित होताना दिसत आहे .यामुळे आषाढी वारी काळात येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ही निर्माण होणार आहे. तसेच जलचर प्राणी व तिथे पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या प्रदूषणा कडे लक्ष देऊन संबंधीतांवर कारवाई केली पाहिजे. सोशल मीडिया ग्रुप व पक्षा द्वारे याबाबत
लेखी निवेदन ही देण्यात आले होते.तरी या जलप्रदूषणा संदर्भात त्यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे. इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष कधी जाणार?
Discussion about this post