Maharashtra : नाशिक : आजच्या भारताची युवाशक्ती ही सर्वात मोठी ताकद आहे.युवकांना इतिहास रचण्याची संधी आहे. तरुणांनी आपले नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल असे कार्य स्वयंस्फूर्तीने करावे असे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दि. १२ जानेवारी रोजी नाशिक येथे केले.
२७ राष्ट्रीय युवा महोत्सवात युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पंतप्रधान म्हणाले, ‘आपल्या देशातील ऋषी, मुनी आणि संतांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनी नेहमीच युवाशक्तीला सर्वोच्च ठेवले आहे. श्री अरबिंदो म्हणायचे की भारताला आपले ध्येय साध्य करायचे असेल तर भारतातील तरुणांना स्वतंत्र विचाराने पुढे जावे लागेल. स्वामी विवेकानंद असेही म्हणायचे की भारताच्या आशा भारतातील तरुणांच्या चारित्र्यावर आणि बांधिलकीवर अवलंबून आहेत. श्री अरबिंदो आणि स्वामी विवेकानंद यांचे हे मार्गदर्शन आज २०२४ मध्ये भारतातील तरुणांसाठी एक मोठी प्रेरणा आहे.आज भारताच्या युवा शक्तीचा दिवस आहे. हा दिवस त्या महापुरुषाला समर्पित आहे ज्यांनी गुलामगिरीच्या काळात भारताला नवीन ऊर्जा दिली. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त मी नाशिकमध्ये आहे हे माझे भाग्य आहे. मी तुम्हा सर्वांना राष्ट्रीय युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.’
’22 जानेवारीपर्यंत आपण सर्वांनी देशातील तीर्थक्षेत्रे, मंदिरे स्वच्छ करून स्वच्छता मोहीम राबवावी, असे आवाहन मी केले होते. आज मला काळाराम मंदिराला भेट देण्याचे आणि मंदिर परिसराची स्वच्छता करण्याचे सौभाग्य मिळाले आहे. मी देशवासियांना पुन्हा आवाहन करतो की, देशातील सर्व मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांमध्ये स्वच्छता मोहीम राबवावी आणि राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होण्याच्या शुभमुहूर्तावर श्रमदान करावे.’ असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी ३० हजार ५०० कोटींहून अधिक रकमेच्या विकासप्रकल्पांचा शुभारंभही पंतप्रधानांच्या हस्ते झाला.तरुणांना संबोधित करताना मोदींनी त्यांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आणि माताभगिनींबद्दल अपशब्द वापरण्याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले.
Discussion about this post