व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी पोलीस ठाण्यात दि.२ मे सोमवार रोजी संध्याकाळी ६ वाजता शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.शहरातील कायदा – सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सामाजिक सलोखा, एकोपा, एकता राहावी यासाठी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी ते उदाहरण देत म्हणाले मातीच्या गोळ्याला जस जसा आकार देऊ तस तसा तो घडत असतो.लहान व तरुण वयात योग्य व अयोग्य विचार माणसांना घडवत असतात.लहान मुलांना व तरुणांना योग्य त्या वयात,योग्य अश्या वेळेत , योग्य असे विचार देत,योग्य विचारांवर ,योग्य अश्या वाटेवर आणणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. या बैठकीत आळंदी ग्रामस्थ, गावातील सर्व पक्षांचे मान्यवर नेते,आळंदी दक्षता सेवा फाउंडेशन सदस्य,उपस्थित होते.आळंदी ग्रामस्थ यांच्या वतीने डी. डी. भोसले पा. यावेळेस म्हणाले
माऊलींनी विश्वाच्या कल्याणा साठी पसायदान
सांगितले आहे.संत ज्ञानेश्वरांच्या या भूमीत या गावात जाती धर्म भेदांना कधीच थारा नागरिकांनी दिला नाही.नेहमीच गावातील सर्व नागरिकांचे एकमेकांशी मैत्री प्रेमपूर्वक संबंध राहिले आहेत.
प्रशांत कुऱ्हाडे यावेळी म्हणाले भीमा कोरेगाव हाकेच्या अंतरावर असून सुद्धा आळंदीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही.आळंदीच्या नागरिकांमध्ये जाती भेद हा प्रकारच नाही.जातीभेद करताना ही दिसत नाहीत.
आरिफ शेख यावेळी म्हणाले गावात कोणताही उत्सव व सण असो, जात पात न जुमानता
सर्व नागरिक एकत्र येऊन उत्सव ,सण साजरे करत असतात. गावातील वरिष्ठ मंडळींनी कधीही गावात जाती धर्मावरून राजकारण केले नाही.
कोणतीही धर्म जात न पाहता नेहमीच ग्रामस्थ हे एकमेकांना
सहकार्य, मदत करत असतात.
Discussion about this post