Mumbai : राज्यातील बहुचर्चित आमदार अपात्रतेचा निकाल आता कधीही लागू शकतो. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालपत्राचा मसुदा तयार करून कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील कायदेतज्ज्ञांकडे पाठविला असल्याचे वृत्त आहे.
यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांचे गट निकाल कधी लागणार याकडे डोळे लावून बसले आहेत.
या निकालासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार १० तारखेपर्यंत निकाल लागणे अपेक्षित आहे. तथापि नार्वेकर हा निकाल त्यापूर्वीही जाहीर करू शकतात. निकालाच्यावेळी दोन्ही गटांचे वकील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नेमका निकाल काय लागणार याकडे दोन्ही गट आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
Discussion about this post