व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –
राष्ट्रवादी कॉंग्रेसने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर भाडोत्री पद्धतीने शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला …
का तर विषय होता भाजपचा पाच वर्षातील पालिकेतील भ्रष्टाचार ,..
राष्ट्रवादी काँग्रेसचा मागच्या पंधरा वर्षातील त्यांच अपयश लपवायचा हा एक केविलवाना प्रयत्नच होता .मराठीमध्ये एक म्हण आहेना की ” उलटा चोर कोतवाल को डांटे” अगदी त्याच पद्धतीने घराणेशाहीवर आणि मुजोर शाहीवर चाललेल्या या पक्षाने स्वताच्या भ्रष्टाचाराचे पाढे गिरवण्याऐवजी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असणार्या भाजपला डिवचण्याचे काम चालवले आहे ..
परंतु जनता ही आता हुशार झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात फक्त कागदोपत्री पुर्ण असणारी कामे प्रत्यक्षात जनतेला कधीच दिसली नाही. आमच्या काळात शहराचा खुप विकास झाला असा दिंडोरा पिटवणाऱ्या राष्ट्रवादीने केवळ जनतेचा भ्रमनिरासच केला आणि त्यामुळेच पिंपरी चिंचवड शहरातील जनतेने २०१७ ला राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखवुन देत पालिकेची सुत्र भाजपच्या हातामध्ये दिली आणि त्यानंतर जो पिंपरी चिंचवड शहरातील सामाविष्ट गावांमध्ये झपाट्याने झालेला विकास पाहता पुन्हा एकदा भाजपाच पिंपरी चिंचवड शहराची सुत्र संभाळणार हे निश्चित झाल.
कायम स्वरुपी आपला कौटुंबिक फायदा पहाणार्या राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी चिंचवडची जनता ओळखुन आहेच भाजपच्या सत्तेपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात स्वतः आमदार असणार्या तत्कालीन आमदार साहेबांनी आपल्याच कुटुंबातील सदस्यांना महापौर नगरसेवक ,यांसारखी पदे देऊन सर्व कारभार घरातच ठेवला .तर त्याऊलट भाजपच्या सत्ताकाळात भाजपचे शहर अध्यक्ष आमदार महेश दादा लांडगे आणि आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी समाविष्ट गावातील नगरसेवकांना पालिकेतील सर्वच महत्वाच्या पदांवर बसविले यातुनच जनतेने सर्व ओळखुन घेतले की शहरासाठी कोण योग्य आहे…
आता रहीला प्रश्न आंदोलनाचा तर ज्यावेळी यांचे ग्रुहमंत्री १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात अडकतात यांचे मंत्री बलात्काराच्या प्रकरणात अडकतात यांचे मंत्री पंतप्रधानांना मारण्याच्या धमक्या देतात यांचे मंत्री विशिष्ट समाजावर खालच्या पातळीवर जावुन टिका करतात तेंव्हा हे आंदोलन करणारे यावर का गप्प बसतात अहो जनता तुमच्या खोट्या भुलथापांना कधीच बळी पडणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा भोळ्याभाबड्या जनतेला खोटेनाटे बोलुन भाजपा विरुद्ध भडकवुन काहिही साध्य होणार नाही…… गोलमाल है भाई सब गोलमाल है….
लक्षात ठेवा अबकी बार भाजपा १००पार
येणार तर भाजपच असे मत रासकर यांनी व्यक्त केले.
Discussion about this post