व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. मात्र, एल निनोच्या प्रभावामुळे आगामी पावसाळ्यात सरासरीपेक्षा बराच कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.
त्यामुळे पाणीकपात धोरण तयार करावे.पाणीपुरवठ्याबाबत आराखडा तयार करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले.शहराची पाण्याची गरज लक्षात घेऊन आयुक्त सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठा विभागाची विशेष बैठक झाली. त्यास सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता रामनाथ टकले, अजय सूर्यवंशी, डी. डी. पाटील आदी उपस्थित होते.
Discussion about this post