Pimpri News : पिंपरी : मनोज जरांगे आणि अजय बारस्कर यांच्यातील वाद हा वैयक्तिक पातळीवरील वाद असून त्यात सरकारला ओढू नये.सरकारने या वादात विनाकारण अडकू नये असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
मोशी येथे उद्यापासून भारतीय बनावटीची शस्त्रास्त्रे आणि अद्ययावत लढाऊ वाहने यांचे ‘डिफेन्स एक्स्पो’ प्रदर्शन सुरू होत आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी सामंत येथे आले असताना माध्यमांशी बोलत होते.
जरांगे यांचे सहकारी अजय बारस्कर यांनी जरांगेंवर गंभीर आरोप केल्यामुळे या दोघात वाद निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता सामंत असे म्हणाले.
Discussion about this post