व्हीएसआरएस मराठी न्युज –सोलापुर, दिनांक :- १० जुलै २०२३काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपच्या वतीने खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे गुजरात मधील न्यायालयाने दोन वर्षे शिक्षा दिली. त्याविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान दिले असता स्थगिती देण्यास नकार दिली. भाजपा आणि मोदी सरकार विरोधात बोलणाऱ्यांवर खोट्या केसेस करून त्यांचे तोंड बंद करण्याची गुजराती स्टाईल, आणि लोकशाहिचा गळा घोटण्याऱ्या भाजप आणि मोदी सरकार विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट येथे सोलापुर शहर काँग्रेसच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुलजी गांधी यांच्या समर्थनार्थ आणि मोदी सरकारच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्या झंझावतामुळे नट्टापट्टा करत देशात परदेशात नेहमीच खोटे बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या पायाखालची वाळू सरकली, अनेक राज्यात त्यांचा पराभव होत आहे. त्यामुळे घाबरून जाऊन राहुलजी गांधी यांची खासदाराकी रद्द केली त्यामुळे राहुलजी गांधी घाबरले नसून उलट अजुन जोमाने काम करीत आहेत. मोदी सरकारमुळे जनतेला त्रास होत असून महागाई, बेरोजगारी, प्रचंड वाढले असताना जनतेच्या प्रश्नांकड़े लक्ष न देता नरेंद्र मोदीनी ज्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले त्यांच्याबरोबरच अभद्र युती करून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करून लोकशाहिचा खून केला. हे सरकार जास्त दिवस ठिकणार नाही. लोकांचा कल बदलत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षच स्थिर सरकार देऊ शकेल. समाजातील नागरिक, व्यापारी, पत्रकारांसह, काँग्रेस कार्यकर्ते आणि सर्व घटक एकत्र येऊन लढायचे आहे. भाजपा सत्तेसाठी काहीही केरायला तयार असते म्हणून जनतेने सावध राहिले पाहिजे. सोलापुरात सुद्धा राजकीय स्वार्थासाठी षडयंत्र रचले गेले होते पण सोलापुरची जनता त्यास बळी पडली नाही. तसेच तेलंगणात BRS पार्टीचा पराभवाचा सर्व्हे समोर आला असताना सुद्धा महाराष्ट्रात, सोलापुरात येऊन सत्तेचे स्वप्न पाहत आहेत त्यांच्यापाठिमागे कोण आहेत हे बघायला पाहिजे.
या आंदोलनात आमदार प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, मा. बाबा मिस्त्री, नगरसेवक प्रवीण निकाळजे, तौफ़ीक़ हत्तूरे, विनोद भोसले, नरसिंग कोळी, मा. नगरसेविका सुशिलाताई आबूटे, अनुराधा काटकर, फिरदौस पटेल, वैष्णवीताई करगुळे, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, प्रवक्ते अशोक निंबर्गी, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, नरसिंह आसादे, अँड मनीष गडदे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास बाबा करगुळे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरेशी, वसिम पठाण, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड़, अरुण साठे, मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, हेमाताई चिंचोळकर, दत्तू बंदपट्टे, विश्वनाथ साबळे, मकबूल मोहोळकर, राजन कामत, नागनाथ कदम, पशुपती माशाळ, शकील मौलवी, NK क्षीरसागर, अंबादास गुत्तिकोंडा, जेम्स जंगम, आशाताई म्हेत्रे, सुमन जाधव, अश्विनी जाधव, अमोल भोसले, अनिल मस्के, भारती इप्पलपल्ली, अरुणा वर्मा, तिरुपती परकीपंडला, दिनांनाथ शेळके, श्रीकांत वाडेकर, प्रवीण वाले, वैभव पाटील, हारून शेख, नूरअहमद नालवार, संजय गायकवाड़, समीर काझी, युवराज जाधव, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल, शोभा बोबे, हाजी मैनुद्दीन शेख, अनिल जाधव, अरमान पटेल, सागर शहा, रमेश जाधव, परशुराम सतारेवाले, राजू हुंडेक़री, सुभाष वाघमारे, नामदेव फुलारी, लता गुंडला, मुमताज तांबोळी, रवि आंबेवाले, अनुपम शहा, शकील शेख, अप्पासाहेब बगले, शिल्पा चांदने, नागनाथ शावने, शिवशंकर अंजनाळकर, सत्यनारायण संगा, रुकैयाबानु बिराजदार, बसंती सालुंखे, लता सोनकांबले, एजाज बागवान, धीरज खंदारे, सायमन गट्टू, प्रकाश गेंटयाल, रुस्तम कंपली, नासिर बंगाली, शोहेब महागामी, बालाजी जाधव, लखन गायकवाड़, करीमनिस्सा बागवान, संघमित्रा चौधरी, श्रीशैल रणदिवे, दिनेश म्हेत्रे, भाग्यश्री कदम, दाऊद नदाफ, सलीम मनुरे, नीता बनसोडे, अरुणा भालेराव, कालिदास काळपगार, मेघश्याम गौड़ा, चंद्रकांत टिकके, हनमंतु रूपनर, जब्बार शेख, मनोहर चकोलेकर, चंदाताई काळे, मुमताज शेख, हुस्नाबानो चंडरकी, विजयालक्ष्मी झाकने, करीम शेख, शकूर शेख, सुनीता बेरा, शनैश्वर आसादे, राहुल पाटील, दयानेश्वर जाधव, शिवाजी धोत्रे, मनोहर सालुंखे, संतोष शिरकुल, गोविंद व्हरगंटी, डी बी मस्के, यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post