व्हीएसआरएस मराठी न्युज -महापालिकेच्यावतीने चोवीस तास पाणीपुरठा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, शहरातील नियमित पाणीपुरवठ्याचे तीन तेरा वाजले आहेत. नियमित पाण्यासाठी महापालिकेसमोर काँग्रेसच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळपासून मनपाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत लाक्षणिक न उपोषण सुरू करण्यात आले आहे.
शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळपासून आंदोलन सुरू आहे. यावेळी माजी महापौर कवीचंद भाट, काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, माजी नगरसेविका निर्मला कदम, शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ब्लॉक अध्यक्ष र माऊली मलशेट्टी, दिनकर भालेकर, विश्वनाथ जगताप, शिक्षण मंडळाचे प माजी सभापती अभिमन्यू दहीतुले
उमेश खंदारे, बाबा बनसोडे डॉ. मनीषा गरुड सहभागी झाले आहेत.
या बेमुदत लाक्षणिक उपोषणास समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रफिकभाई कुरेशी, भाट समाज तरुण मंडळाचे अध्यक्ष आनंद भाट, मातंग एकता आंदोलनाचे राधिका अडागळे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने चोवीस तास पाणीपुरवठा करू असे जाहीर आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण करण्याऐवजी पिपरी चिंचवड शहरातील नागरिकांना मागील अडीच वर्षांपासून दिवसाआड व अनियमित कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. याला लोकप्रतिनिधी आणि भाजपचे पदाधिकारी जबाबदार आहेत. पाणीपुरवठा सुरळीत करू असे प्रशासनाने अनेकदा आश्वासन देऊन अद्यापही पाणीपुरवठा पूर्णवेळ व सुरळीतपणे सुरू झालेला नाही याचा जाब विचारण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे, असे सायली नढे यांनी सांगितले.
Discussion about this post