व्हीएसआरएस मराठी न्युज-आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदीत भामा-आसखेड पाणीपुरवठा मुख्य विभागातच तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने आज आळंदी नगरपरिषदे च्या वतीने मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी प्रेस नोट द्वारेच जाहीर केले की,सर्व नागरिकांना कळवण्यात येत आहे की,गुरुवारी २१/०४/२०२२ रोजी रात्री ११ वाजल्या पासून भामा-आसखेड पंपहाऊस येथील मोटारींना विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्यांमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने भामा-आसखेड पंपहाऊसमधून पुणे महानगरपालिका व आळंदी नगरपरिषदेसाठी करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
आळंदी कुरुळी टॅपिंग मधून आळंदी शहरासाठी होणारा पाणीपुरवठा थांबल्याने काल शुक्रवार दि.२२/०४/२०२२ रोजी आळंदी गावठाण परिसरातील पाणीपुरवठा व आज २३/०४/२०२२ रोजीचा हवेली विभागातील पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही.भामा-आसखेड पंपहाऊस मधील तांत्रिक दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरच
गावठाण विभाग व हवेली विभागातील पाणीवितरण जलशुद्धीकरण केंद्राकडे उपलब्ध
होणाऱ्या पाणीसाठयानुसार टप्प्याटप्प्याने पूर्वरत करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घेऊन नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा व नगरपरिषदेस सहकार्य करावे.
पाणी विभागाचे आधिकारी सोनटक्के साहेब यांना काल संपर्क केला असता त्यावेळी सांगितले होते की,भामा-आसखेड धरण पंपहाऊस मधूनच तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने शहरातील पाणीपुरवठा बंद आहे. तेथील तांत्रिक दुरुस्ती झाल्यानंतरच आळंदी शहराला पाणीपुरवठा केला जाऊ शकतो.
आळंदीत पाणी पुरवठ्याचे दोन भागात विभाजन करण्यात आले आहे. गावठाण व हवेली या दोन विभागात पाणीपुरवठयाचे नियोजन करण्यात आले असून दोन्ही विभागात दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असतो. त्यामुळे या विभागांमध्ये एक दिवसांचा ही, पाणीपुरवठयाचा उशीर झाल्यास काही गल्लो गल्लीतील नागरिक पाण्याचे टँकर विकत घेताना दिसतात.
माऊली मंदिर,माऊलींच्या बागेत
ही नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी फिरताना
दिसत आहेत.
मागच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या काळात ही उन्हाळ्या मध्ये आळंदी नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरणाच्या पंपामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली होती.शहरात दोन ते तीन दिवसां पेक्षा जास्त पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता.त्यावेळेस काही प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी आळंदी शहरात टँकर द्वारे पाणीपुरवठा केला त्याचाच आज उजाळा काही नागरीक करत होते.जर सध्या निवडणूक लांबणीवर गेली नसती व निवडणूक परिस्थिती असती तर काही इच्छुक उमेदवारांनी निश्चित गावात टॅंकर द्वारे पाणीपुरवठा केला असता.
भविष्यात ही अश्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्यासाठी नगरपरिषदेकडून पर्यायी व्यवस्था काय?असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
Discussion about this post