व्हीएसआरएस मराठी न्युज -महिला आरक्षण विधेयकावर संसदेत जोरदार चर्चा सुरु आहे. या विधेयकावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपले मत मांडले आहे. महिला आरक्षण विधेयकाला आमचा पाठिंबा आहे. परंतु, हे विधेयक अपूर्ण आहे, असे राहुल गांधींनी म्हंटले आहे.
या विधेयकात ओबीसी आरक्षणाची भर पडली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
राहुल गांधी म्हणाले की, महिला आरक्षण विधेयकाला आमचा पाठिंबा आहे, हे महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. महिलांनीही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे. हे आपल्या बरोबरीचे आहेत आणि अनेक बाबतीत आपल्याही पुढे आहेत, पण माझ्या मते हे विधेयक अपूर्ण आहे. यात ओबीसी आरक्षणाची भर पडली पाहिजे.
विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी नवीन जनगणना आणि सीमांकन आवश्यक आहे. परंतु, ते आता लागू केले जाऊ शकते असे माझे मत आहे. त्यासाठी लोकसभा आणि विधानसभेच्या ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवाव्या लागतील, असेही त्यांनी म्हंटले आहे.
जेव्हा विरोधक जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित करतात तेव्हा भाजप लक्ष वळवण्याचा प्रयत्न करते. यासाठी नवीन कार्यक्रम आयोजित करतो. ओबीसी आणि भारतीय लोक याकडे लक्ष देऊ नयेत म्हणून हे केले जाते, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
संस्थांमधील ओबीसींच्या टक्केवारीबाबत संशोधन करण्यात आले. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत, पण केंद्र सरकारमधील 90 सचिवांपैकी केवळ 3 ओबीसी समाजातील आहेत. ते भारताच्या बजेटच्या पाच टक्के नियंत्रित करतात. हा ओबीसी समाजाचा अपमान असल्याचा दावा राहुल गांधी यांनी सभागृहात केला. दलित आणि आदिवासी किती आहेत? या प्रश्नाच्या उत्तरासाठी जातिगणना आवश्यक आहे. आमच्याद्वारे केलेल्या जनगणनेची आकडेवारी लवकरात लवकर जाहीर करा अन्यथा आम्ही करू, असेही त्यांनी म्हंटले आहे.
Discussion about this post