व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पुणे-मुंबई द्रुतगती (Pune-Mumbai Expressway) मार्गावरील टोलमध्ये पुन्हा 18 टक्क्यांनी (toll rates) वाढ होणार आहे.
पुढच्या वर्षापासून म्हणजे एक एप्रिलपासून ही दरवाढ लागू होईल. प्रत्येक तीन वर्षांनी ही वाढ ठरलेली आहे. याआधी 1 एप्रिल 2020 मध्ये अशीच वाढ झाली होती. मात्र 1 एप्रिल 2023 ला लागू होणारे टोलचे दर हे 2030 पर्यंत कायम असतील, असं एमएसआरडीसी कडून सांगण्यात आलं.
पुणे- मुंबई या दोन शहरांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. त्यामुळे अनेकदा मार्गावर मोठ्या प्रमाणाच वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावं लागतं. वाहतूक कोंडी आणि अपघात या दोन्हीमुळे हा मार्ग कायम चर्चेचा विषय ठरतो. अनेकदा यावर प्रशासनाकडे प्रश्न विचारले जातात. मात्र त्यावर तोडगा काढला जात नाही. सुविधा पुरवल्या जात नाही मात्र टोल वाढ नित्यनेमाने केली जाते. यंदा किमान सध्याच्या दरापेक्षा 60 ते 70 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
आयटीएमएस म्हणजे इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम (Intelligent Transport Management System ) लागू करण्याची करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या सिस्टिमद्वारे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होईल. या प्रणालीमध्ये ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचं रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचेल. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील. त्याशिवाय अशा वाहनांना अडवण्याचे निर्देश पोलिसांना मिळतील, ज्यामुळे अशा वाहनांना अडवून संभाव्य अपघात टाळता येतील. 39 ठिकाणी वाहनांचा वेग मोजणारी यंत्रे असणार आहेत. मात्र या योजनेची अंमलबजावणी होण्याआधीच अवाजवी टोलच्या दरात वाढ केल्याने सगळीकडून टीका होत आहे.
Discussion about this post