व्हीएसआरएस मराठी न्युज -राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेला 24 वर्ष पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्रातील राजकारणामध्ये या पक्षाचे एक वेगळे स्थान आहे. स्थापनेपासून हा पक्ष कायमच राज्यातील सत्ताकारणारच्या केंद्रस्थानी राहिला आहे.
10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 24 वर्ष पूर्ण होऊन पक्ष 25 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. त्या दिवशी सकाळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदेश कार्यालयाबाहेर ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय 25 मे 1999 रोजी तीन प्रमुख भारतीय नेत्यांनी घेतला. राष्ट्रीय काँग्रेसमधून सोनिया गांधींच्या इटालियन वंशाच्या मुद्यावरुन या तीन नेत्यांना काढून टाकण्यात आले होते. त्यामध्ये शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर यांचा समावेश होता. नंतर आपल्या हजारो समर्थकांसह दिल्लीमध्ये गुरुद्वारा रकाबगंज क्रमांक 6 येथे हे नेते जमले. त्यावेळी त्यांनी नवीन पक्षाची स्थापना केली हा दिवस देशात रेड लेटर डे म्हणून ओळखला गेला. शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि पी.ए संगमा तसेच तारिक अन्वर यांना सरचिटणीस करण्यात आले. भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला. अत्यंत कमी कालावधीत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा इतिहासातील पहिला पक्ष होता.
राष्ट्रवादीची स्थापना सोनियांच्या नेतृत्वाला विरोध असतानाही गांधी यांच्या नेतृत्वाखालील युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स (यूपीए) मध्ये सामील झाला. एवढेच नाही तर ऑक्टोबर 1999 मध्ये महाराष्ट्राचे सरकार त्यांच्या सोबतीने स्थापन झाले. त्यानंतर 2004 मध्ये, मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सरकार स्थापन करण्यासाठी पक्ष यूपीएमध्ये सामील झाला. राष्ट्रवादीचे नेते, शरद पवार यांनी सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दोन्ही पाच वर्षांच्या कार्यकाळात कृषी मंत्री म्हणून काम केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2014 पर्यंत कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य सरकारचा भाग राहिला. 20 जून 2012 रोजी पी. ए. संगमा यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडली. त्यात त्यांचा पराभव झाला. एप्रिल आणि मे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (एनडीए) यूपीएचा पराभव झाला आणि दहा वर्षात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमधून बाहेर पडली. ऑक्टोबर 2014 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाशी असलेली युती तोडली आणि ते स्वबळावर लढले. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आणि सुरुवातीला राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अल्पमतात सरकार स्थापन केले.
Discussion about this post