व्हीएसआरएस मराठी न्युज –युवा नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी (दि. 21) पिंपरीत सभा घेतली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूकी बाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “आमच्यासाठी राज्यात फक्त मावळ लोकसभाच नाहीतर सर्वच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महत्त्वाच्या आहेत.
आदित्य ठाकरे म्हणाले, “आज राज्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. राज्यातील सर्व उद्योग धंदे राज्य बाहेर पाठवले जात आहेत. आमच्या तोंडाचे घास देखील पळवले जात आहेत.
उद्योग क्षेत्र, कृषी क्षेत्र कोलमडले आहे. मुख्यमंत्री घटना बाह्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी प्रत्येक सीटवर जिंकून येणं हे खूप महत्त्वाच आहे. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करण्यासाठी प्रत्येक उमेदवार जिद्दीन आणि ताकदीने जिंकन गरजेचं आहे असं मत युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड शहरात बोलताना व्यक्त केला आहे.
Discussion about this post