व्हीएसआरएस मराठी न्युज –
पुण्याहून मुंबई च्या दिशेने प्रवासी घेऊन जाणाऱ्या इरटीका कारला भीषण अपघात झाला आहे. अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तीन जण गंभीर ( car accident on highway ) जखमी आहेत.
पिंपरी-चिंचवड (पुणे) : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील कारच्या भीषण अपघात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना ढेकू गावच्या हद्दीत घडली आहे. इरटीका कारमध्ये मुंब च्या दिशेने जाण्यासाठी सर्व प्रवासी प्रवास करत होते. तेव्हा, ढेकू गावच्या हद्दीत येताच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने समोरील वाहनांना भीषण धडक दिली. यात जागीच पाच जणांचा मृत्यू झाला आहे. इरटीका कारमध्ये एकूण आठ प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवासी घेऊन जाणाऱ्या इरटीका कारला भीषण अपघात झाला आहे. अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तीन जण गंभीर जखमी आहेत. त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ढेकू गावच्या हद्दीत हा अपघात झाला असून चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघात कारचा चक्काचूर झाला आहे. रात्री 11 वाजून 40 मिनिटांच्या दरम्यान हा अपघात झाला. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स, लोकमान्य रुग्णालय आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी यावेळी मदत कार्य केले. हा अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला आहे. अपघात स्थळी खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक शिरीष पवार, पोलीस उपनिरीक्षक योगेश भोसले इत्यादीने या अपघाताची चौकशी सुरू केली आहे. मच्छिंद्र आंबोरे वय ३८ वर्ष(चालक), अमीरउल्ला चौधरी व दिपक खैराल हे गंभीर जखमी झाले आहेत.
Discussion about this post