व्हीएसआरएस मराठी न्युज -निगडी प्राधिकरणातील गणेश तलावातील तीन वर्षापासून गाळ काढण्यात आलेला नाही. गाळ काण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेविका शर्मिला बाबर यांनी केली आहे.
महापालिकेने प्राधिकरण परिसरातील गणेश तलाव विकसित केला आहे. तलाव परिसरात मोठया प्रमाणावर गवत वाढले आहे. त्यामुळे गणेश तलाव ही शहरातील आणि प्राधिकरणातील एक सुंदर जागा असताना आता नेमका हा तलाव आहे की राडारोडा टाकण्याचे ठिकाण, हे समजायला मार्ग नाही. तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे.
असून परिसराचे विद्रुपीकरण झाले आहे. येत्या ७ ते १० दिवसांत जर प्रशासनाने काहीही हालचाल केली नाही तर नागरिक उपोषणाला बसणार आहोत. याची गंभीरतेने दखल घ्यावी, अशी | मागणी माजी नगरसेविका बाबर यांनी केली आहे.
Discussion about this post