Pimpri News : पिंपरी : आयटी हब हिंजवडीमध्ये एका आयटी इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एका लॉजमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. खून करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोघेही लखनौचे रहिवासी असून एका आयटी कंपनीत कामाला होते. ते दोन दिवस लॉजमध्ये थांबले असता लखनौहून आलेल्या ऋषभ निगमने महिलेचा खून केला आणि खून केल्यानंतर तो मुंबईला पळून गेला. मात्र पळून जाताना तो मुंबई पोलिसांपासून सुटू शकला नाही. मुंबई पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान त्याला पिस्तुलासह अटक केली होती. प्रेमप्रकरणातून महिलेची हत्या झाल्याचे समोर आले आहे. आता पोलीस या ऋषभ निगमची चौकशी करणार आहेत. मग, रात्री कशावरून वाद झाला? खून कसा झाला? बंदूक आली कुठून? याबाबत स्पष्टीकरण येणे बाकी आहे.
पुण्यातील हिंजवडी परिसरात अनेक मोठ्या आयटी कंपन्या आहेत. देशाच्या विविध भागातून अनेक तरुण अभियंते या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी येतात. देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले तरुण एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि नंतर काही चुकले की टोकाचे निर्णय घेतात. आतापर्यंत या क्षेत्रातील तरुण अभियंत्यांशी संबंधित अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. या प्रेमप्रकरणातून या आयटी इंजिनिअर महिलेची हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
Discussion about this post