व्हीएसआरएस मराठी न्युज -शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
रूपीनगर येथे शुक्रवारी (दि. ०८) सायंकाळी सहा वाजता इफ्तार पार्टी झाली. यावेळी या कार्यक्रमास शुभेच्छा देताना माजी आमदार विलास लांडे म्हणाले की, सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे आवश्यक आहे.
सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन होणे सुद्धा महत्त्वाचे आहे. दोन समाज एकत्र आल्याने मतभेद दूर होऊन बंधुत्त्व भावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे. अशा सणांमुळे हिंदू-मुस्लिम बांधव मनापासून एकत्र येतात. सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत होत असून त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते. आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टी महत्त्वाची आहे.
रुपीनगर तळवडे येथील मुस्लिम समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post