व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:दि.१४ आळंदी शहरात लग्नतिथी मुळे व काही अवजड वाहनांनी शहरात प्रवेश केल्याने आज काही प्रमाणात वाहतूक कोंडीचे चित्र दुपारी दिसले.
प्रदक्षिणा रस्त्यावर व नृसिंह स्वामी मठाच्या पुढील भागात असणाऱ्या मंगल कार्यालयांच्या समोरच्या रस्त्यांवरच दुतर्फा वाहने लावल्याने वाहतूक कोंडी दिसून आली.प्रदक्षिणा रस्त्यावर नो पार्किंग असलेल्या फलका समोरच चारचाकी वाहने दिसून आली तसेच लग्नासाठी आलेली बस सुध्दा प्रदक्षिणा रस्त्यावर नो पार्किंग असलेल्या जागेत दिसून आली.आज चाकण चौकात तसेच माहेश्वरी भक्त निवास ते चाकण चौक येथे काहीश्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालेली दिसली. नो पार्किंग च्या फलकामुळे प्रदक्षिणा रस्त्यावर लागणाऱ्या दुतर्फा वाहनांचे प्रमाण कमी होईल असे पालिका व वाहतूक प्रशासनास वाटले होते.परंतु लग्नतिथी ला सरास पणे नो पार्किंग च्या फलका समोर ठराविक अंतर दिलेल्या अंतराच्या आतच वाहने रस्त्यावर लावलेली दिसून येतात. मंगल कार्यालयाच्या अपुऱ्या पार्किंग मुळे वाहने रस्त्यावर लागतात.त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास गावातल्या व कामानिमित्त रहदारी करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतो.
अशी भावना काही आळंदीकर नागरिकांनी व्यक्त केली आहे.
चाकणचौक,नदीपलीकडे,
नगरपालिके जवळ अश्या ई.काही अल्पशा ठिकाणीच पालिकेची व खाजगी जागा असणारी पार्किंग व्यवस्था उपलब्ध आहे.मरकळ रस्ता ,वडगांव रस्ता व इतर विविध ठिकाणी दुतर्फा रस्त्यावरच वाहने पार्किंग केलेली आढळून आली.
वडगांव रस्त्यावरील पार्किंग व्यवस्था काम पूर्ण झाले असून सुद्धा ते काही कारणास्तव उपलब्ध नाही.वाहतूक पोलीसांकडून दंण्डात्मक कारवाई
होऊन सुद्धा लग्नतिथी दरम्यान
अशी सारखी परिस्थिती निर्माण होत आहे.यावर आळंदीकर नागरिक वारंवार नाराजी व्यक्त करत आहे.
Discussion about this post