Pimpri News : पिंपरी : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकर्यांच्या मागण्यांसाठी काढलेल्या आक्रोश मोर्चाची दि. २७ डिसेंबर रोजी शिवनेरीवरून सुरुवात झाली.
पहिल्यादिवशी ओतूर, आळेफाटा, नारायणगाव, कळंब, मंचर, राजगुरूनगर, केंदूर या गावांमधून मोर्चाची वाटचाल होणार आहे.
बारामती मतदारसंघातील इंदापूर, पाटस, लोणी काळभोर या गावातूनही हा मोर्चा जाणार असून त्याची सांगता ३० डिसेंबर रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयानजिक सभेने होणार आहे.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी,शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ‘शैक्षणिक कर्ज’ धोरण लागू करावे, कांदा निर्यातबंदी तत्काळ उठवावी, कांदा निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण ठरवावे, पिकविमा नुकसान भरपाई तातडीने मिळावी, दूधउत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, बिबट्यांचा वावर असलेल्या तालुक्यात शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा व्हावा अशा शेतकरी आक्रोश मोर्चाच्या प्रमुख मागण्या आहेत.
Discussion about this post