व्हीएसआरएस न्युज दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा ३१७ धावांनी पराभव करत चार सामन्यांच्या मालिकेत १ -१ अशी बरोबरी साधली.
भारताने दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर विजयसाठी ४८२ धावांचे आव्हान ठेवले होते. पण, पदार्पणाची कसोटी खेळत असलेल्या अक्षर पटेलच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव १६४ धावात आटोपला. अक्षर बरोबरच अश्विननेही ३ विकेट घेत इंग्लंडला घाम फोडला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात मोईन अलीने सर्वाधिक ४३ धावा केल्या.
भारताने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी चौथ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव संपवण्याची मोहिम सुरु केली. आज इंग्लंडने आपला दुसरा डाव ३ बाद ५६ धावांपासून खेळण्यास सुरुवात केली.
पण, भारतीय फिरकीपुढे त्याचा टिकाव लागला नाही. अश्विन आणि अक्षर पटेलने आपापसात इंग्लिश शिकार करण्याची स्पर्धाच सुरु केली. अश्विनने लॉरेन्सला २६ धावांवर बाद करत चौथ्या दिवसाची चांगली सुरुवात केली.