व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी पालक मुलांना शाळेत पाठविण्याबाबत सकारात्मक नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्या-टप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे महत्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने या वर्गांचा शाळा सुरू करताना प्रामुख्याने विचार केला जाणार आहे.
त्यानंतर इतर वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू होतील. विषेश म्हणजे सरसकट शाळा सुरू करणार येणार नसल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्याच्या आरोग्याच्यादृष्टीने हे आवश्यक आहे. राज्य सरकारने निर्धारित केलेल्या आरोग्य विषयक सर्व सुचनांचे व खबरदारीचे उपाय करूनच स्थानिक पातळीवर शैक्षणिक संस्थांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे लवकरच बैठक घेऊन विद्यार्थीहिताचा निर्णय घेतील, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.