व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी देशभरात सध्या करोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. वर्षभरापासून यावर भूमिका घेऊन या विषाणूला रोखण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची हाक काँग्रेस नेते राहुल गांधी देत आहेत.
त्यांच्या मुद्द्यांकडे त्यावेळी केंद्र सरकारनेही गंभीरपणे घेतले नव्हते. मात्र, आता त्यांनी सल्ला न देता निवडणुकीच्या कालावधीतही एका महत्वाच्या निर्णयाची घोषणा केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, वाढत्या करोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन निवडणूक प्रचार सभा घेणे योग्य वाटत नाही. त्यामुळे मी सर्व सभा रद्द करीत आहे. इतर नेते आणि सर्वच राजकीय पक्षांनी हा संकटाच्या काळात असाच निर्णय घ्यावा.
राहुल गांधी यांनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल अनेकांनी त्यांना पाठींबा दिला आहे. दरम्यान, भाजपने सभा न घेता प्रचार चालू ठेवण्याचे यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे म्हटले होते. सर्वांना प्रचाराची समान संधी देण्याच्या मुद्द्यावर प्रचार बंद करण्यास भाजपचा विरोध आहे.
मात्र, राहुल गांधी यांनी आवाहन किंवा सल्ला न देता याबाबत थेट निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता भाजप आणि तृणमूल काँग्रेस कोणती भूमिका घेतात की आणखी जोरात प्रचार करून गर्दी वाढवतात याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे.