व्हीएसआरएस न्युज ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात ४ सामन्यांच्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना गुरुवारपासून (१७ डिसेंबर) ऍडलेड येथे खेळला जात आहे. या सामन्यात पहिल्या डावातील भारतीय संघांच्या २४४ धावांना प्रत्युतर देताना ऑस्ट्रेलियाचा डाव १९१ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारतीय संघाला ५३ धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली. दुसऱ्या दिवसाच्या शेवटी ६ षटकांसाठी फलंदाजीला आलेल्या भारताने १ गडी गमावत ९ धावा केल्या. त्यामुळे भारताकडे दिवसाच्या शेवटी एकूण ६२ धावांची आघाडी आहे.
पहिल्या दिवसाच्या ६ बाद २३३ धावांवर सुरुवात करताना भारतीय संघाचा डाव दुसऱ्या दिवशी सकाळी २४४ धावांवर संपुष्टात आला.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक ४ तर ३ बळी घेतले. त्यांनतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने डळमळीत सुरुवात केली. पहिल्या सत्रात जसप्रीत बुमराहने दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात तंबूत धाडले. त्यांनतर आर अश्विनने स्टीव स्मिथ, ट्रॅविस हेड आणि कॅमरॉन ग्रीनला बाद करत ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीला खिंडार पाडले. मार्नस लॅब्यूशाने (४७) आणि कर्णधार टीम पेन (७३)* यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा डाव १९१ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून अश्विन ४ बळी घेत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. तर उमेश यादवने ३ आणि बुमराहने २ बळी पटकावत त्याला सुयोग्य साथ दिली.
शेवटच्या ६ षटकांसाठी फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने पृथ्वी शाॅची विकेट गमावली. पॅट कमिन्सने त्याला अवघ्या ४ धावांवर त्रिफळाचीत केले. मात्र त्यांनतर नाईट वॉचमन म्हणून आलेल्या जसप्रीत बुमराहने सलामीवीर मयंक अगरवालच्या साथीने सावधपणे उर्वरित षटके खेळून काढत अजून पडझड होणार नाही याची काळजी घेतली. दिवसा अखेर १ बाद ९ अशी भारताची धावसंख्या असून त्यांच्याकडे एकूण ६२ धावांची आघाडी आहे.
दुसर्या डावात पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवालची जोडी ओपनिंगसाठी उतरली. पहिल्या डावात खाते उघडण्यात अपयशी ठरलेल्या पृथ्वीला दुसऱ्या डावात फक्त 4 रन करता आले.
पहिल्या डावात मयांक अग्रवालने 17, पुजाराने 43, कोहलीने 74, राहणेने 42, हनुमा विहारीने 16, साहने 9, अश्विनने 15, उमेश यादवने 6 तर बुमराने नाबाद 4 रन केले.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 53, हेजलवूडने 1, कमिन्सने 3, नाथनने 1 विकेट घेतली.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून मॅथिव वेडने 8, जोई बर्नने 8, मार्नसने 47, स्मिथने 1, हेडने 7, कॅमरॉनने 11, टीम पेनीने 73, मिचेल स्टार्कने 15, नाथनने 10 तर जोश हेडलवूडने 8 रन केले.
पहिल्या डावात भारताकडून उमेश यादवने 3, बुमराहने 2, अश्विनने 4 विकेट घेतल्या.
भारतीय टीम:
मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृध्दिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया टीम:
जो बर्नस, मॅथ्यू वेड, मार्नस लॅबुशेने, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, टिम पेन (कर्णधार / विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन ल्यॉन आणि जोश हेजलवुड.