व्हीएसआरएस मराठी न्युज -केंद्र सरकारने सुरू केलेली “अग्निपथ” योजना युवकांना बेरोजगारीच्या खाईत लोटणारी आहे. संरक्षण खात्याचे हे खाजगीकरण सुरू करण्याची सरकारची सुरुवात आहे. ही योजना जो पर्यंत सरकार मागे घेत नाही तो पर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असे प्रतिपादन काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.
अग्निपथ ही योजना फसवी आहे हे नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्यावतीने पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात सोमवारी (दि.२७ जून २०२२) अनुक्रमे काळेवाडी एम. एम. हायस्कूल चौक, पुणे मुंबई महामार्ग चिंचवड स्टेशन येथे आणि साने चौक येथे आंदोलन करून नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
Discussion about this post