व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:-आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतदार यादीचा कार्यक्रम -२०२२ जाहीर करण्यात आला होता.प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात दोष असल्याचे दिसून आले.त्यामुळे त्यावर आज दिवसभरात हजारो हरकती सूचना अर्ज नगरपरिषदेत दाखल झाले आहे.
आळंदी शहरातील अंतिम प्रभाग रचना व प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले होते.त्यानंतर आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतदार यादीचा कार्यक्रम-२०२२ जाहीर करण्यात आला.
तो पुढील प्रमाणे
१) प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी जाहीर करणे-२१/६/२०२२
२)प्रारूप मतदार यादीवर हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी २१/६ /२०२२ ते २७/६/२०२२
३)अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करणे १/७/२०२२
४)मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करणे आणि मतदान केंद्र निहाय मतदान याद्या प्रसिद्ध करणे
५/७/२०२२
आज प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची शेवट ची तारीख असल्याने व प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात दोष असल्याने मतदार नागरिकांची व संबंधित इच्छुक उमेदवारांची संबंधित प्रभागातील नागरिकांची नावे दुसऱ्या वेगळ्या प्रभागात गेल्याने हरकती अर्ज देण्यासाठी मोठी धाववळ झाल्या चे चित्र दिसून येत होते. मतदार यादीत एकाच कुटुंबातील नागरिकांची नावे वेगवेगळ्या प्रभागात लागणे,मतदार यादीत दुबार नावे लागणे,नगरपरिषदे जवळ असणाऱ्या काही नागरिकांच्या मृत्यू नोंदीच्या कागदपत्रांचा तपास न करता मयत व्यक्तींची नावे असणे,नवीन प्रभाग रचना जाहीर झाल्याने त्या प्रभागातील एका भागातील,गल्लीतील
नागरिकांची नावे दुसऱ्या प्रभागात लागणे ई. दोष प्रारूप मतदार यद्यांमध्ये दिसून येत होते. आळंदीतील मतदार नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभाग निहाय प्रारूप मतदार याद्यांमधून आपले नाव शोधण्यासाठी वेगवेगळ्या मतदार यादीतील पाने बारकाईने पाहून स्वतःची व आपल्या कुटुंबातील मतदार नातेवाइकांची नावे मतदार नागरिकांना त्यात शोधावी लागत होती.नवीन प्रभाग रचना झाल्याने त्या नवीन प्रभागातील त्या भागात ,गल्लीत पूर्वी पासून राहून सुद्धा दुसऱ्या वेगळ्या प्रभागात नाव गेल्याने त्यामुळे हरकत अर्ज,संबंधित कागदपत्रे पुरावे जोड या होणाऱ्या धावपळी मुळे प्रारूप मतदार यादीवर आळंदीतील नागरिकांनी नाराजी नाराजी व्यक्त केली आहे.
आषाढी वारी प्रस्थान सोहळा आळंदीत मंगळवारी २१ तारखेला होता .तसेच २२ तारखेला आळंदीतून पालखीचे प्रस्थान सकाळी साडे सहा वाजता पुण्याकडे प्रस्थान झाले. आळंदीतील अनेक नागरिक पुण्या पर्यंत पालखी सोडवण्यासाठी जात असतात.
पालिकेला शनिवार, रविवार सुट्या यामुळे नागरिकांना कमी दिवसांचा कालावधी भेटला. असे मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केले जात होते.तसेच आळंदीतील स्थानिक मतदार अनेक नागरिक या पायी सोहळ्या करिता पंढरपूर च्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.
ते काही नागरिक या कार्यक्रम प्रक्रिया बाबत अनभिज्ञ दिसून येत आहेत.याबाबत ही आळंदी
स्थानिक नागरिकांकडून याबाबत चिंता व्यक्त होत आहेत.
आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम -२०२२
हरकती अर्जांना जोडण्यात आलेल्या रहिवाशी पुराव्या ची योग्य ती कागदपत्रे पाहून निवडणूक आयोगाच्या सुचने प्रमाणे काम केले जाईल व तसेच हरकत घेणाऱ्या नागरिकांना त्यांना संपर्क करून त्या प्रभागातील ठिकाणाची स्थळ पाहणी केली जाईल.असे संबंधित
कर्मचाऱ्यांने माहिती दिली.
Discussion about this post