व्हीएसआरएस मराठी न्युज -कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 625 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 66 586 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1334 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 325 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या १४५९९ सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्णांचं प्रमाण हे पुणे आणि मुंबईमध्ये आहे. पुण्यात ४९६७ रुग्ण आणि मुंबईत १८६५ सक्रीय रुग्ण आहेत. त्याशिवाय ठाण्यामध्ये १०१६, नाशिक ६८८, अहमदनगर ४६०, सोलापूर ३२९ आआणि औरंगाबादमध्ये ३१४ सक्रीय रुग्ण आहेत.
राज्यात आज २३३६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आढळले आहेत. शनिवारी मुंबईमध्ये २६६ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर पुणे मनपा ३१४, पुणे १४५, पिंपरी चिंचवड १९५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मालेगाव मनपा आणि लातूर मनपामध्ये आज कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही.
राज्यात आजपर्यंत एकूण ७८,६९,५९१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.९७ टक्के इतके झाले आहे. राज्यात आज पाच कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४% एवढा झाला आहे.
Discussion about this post