व्हीएसआरएस मराठी न्युज –राज्यातील निवडणुका सतत लांबत आहेत. मागील फेब्रुवारीमध्ये राज्याच्या स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुका होणं अपेक्षित होतं मात्र तरीही निवडणुका जाहीर करण्यात आल्या नाहीत.
सत्ताधाऱ्यांनी मिळून निवडणुकांबाबतचा निर्णय घेतला पाहिजे. या निवडणुकांमध्ये लहान कार्यकर्त्यांना देखील अनेक संधी मिळणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी तारीख पे तारीख न करता निवडणुका जाहीर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
देशात महागाई आणि बेरोजगारी हे दोन महत्वाचे प्रश्न असाताना बाकी गोष्टींवरुन राजकारण सुरु आहे. राजकारण आणि चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक महत्वाचे विषय आहेत. शेतकाऱ्यांचे देखील अनेक प्रश्न आहेत. ग्रामीण भागात अनेक प्रश्न आहे. पिक विमा, रबी हंगामात शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानीचे प्रश्न आहेत. यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Discussion about this post