व्हीएसआरएस न्युज पिंपरी- तुळशी विवाहानंतर पुढील वर्षभर लग्नकार्य होत असतात या पुढील कार्यक्रमांमध्ये प्रत्येक नागरिकानी मास्कचा वापर करून स्वतःची, कुटुंबाची व देशाची काळजी घ्यावी. तसेच शासनाच्या सूचनांचे पालन करू आणि कोरोणावर मात करू,असा संदेश पताका व मास्करुपी अंतरपाठद्वारे देण्यात आला.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पूर्णा नगर, नक्षत्र सोसायटी फेज,२ मध्ये अजय पाताडे यांच्या घरापुढे तुलसी विवाह हा कार्यक्रम आयोजित केला होता.
यापुढे असाच सर्वांनी आनंदी जीवन प्रवास चालू ठेवावा याकरिता सामाजिक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमाचे नियोजन अक्षता अजय पाताडे, मनीषा राजेश नांगरे, रुपाली लक्ष्मीकांत चौधरी, सुवर्णा उत्तम पवार, अमृता दिनेश मिश्रा यांनी केला.यावेळी आदी सदस्य उपस्थित होते.