व्हीएसआरएस न्युज सरकारी एअरलाईन्स कंपनी एअर इंडियामधील निर्गुंतवणुकीसाठी चार कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या.
यातील सर्वाधिक गुंतवणुकीची टाटा समूहाने लावलेली बोली मंजूर करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे.
एअर इंडियावरील मालकी हक्कासाठी चार निविदा आल्या होत्या. त्यामध्ये टाटा सन्ससोबत स्पाइसजेटदेखील स्पर्धेत होते. यामध्ये टाटा सन्सने बाजी मारली असून एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे गेली आहे. टाटा समूहाने एअर इंडियासाठी 18 हजार कोटींची बोली लावली. डिसेंबरच्या अखेरीपर्यंत एअर इंडियाच्या हस्तांतराचा व्यवहार पूर्ण होईल, अशी माहिती डीआयपीएएमचे सचिव तुहिन कांत पांडे आणि नागरी उड्डान मंत्रालयाचे सचिव राजीव बंसल यांनी दिली.
Discussion about this post