व्हीएसआरएस न्युज मंदिरे उघडण्यासंदर्भातील एक मोठी बातमी सध्या समोर येत आहे. राज्यातील मंदिरे सात ऑक्टोबरपासून उघडली जाणार आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद करण्यात आलेली आहेत.
लॉकडाऊन हटवला असून संसर्गाची परिस्थितीही हातात असल्यामुळे आता मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे उघडली जाणार आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
Discussion about this post