व्हीएसआरएस न्युज काँग्रेस नेत्यांनी पक्ष शिस्त पाळावी, एकत्र यावं, वैयक्तिक महत्वाकांक्षा बाजूला ठेऊन पक्ष संघटनेसाठी काम करावं, असं आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलं आहे.
दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. त्यामध्ये त्या बोलत होत्या.
काँग्रेसच्या मंगळवारी (26 ऑक्टोबर) झालेल्या बैठकीत सोनिया गांधी यांनी नेत्यांना खडेबोल सुनावले. काँग्रेस मुख्यालयातून मांडल्या जाणाऱ्या भूमिका तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत नाहीत, असं सोनिया गांधी यांनी म्हटलंय. भाजप-संघाच्या द्वेषाच्या विचारधारेचा सामना करायचा आहे असंही त्यांनी नेत्यांना सांगितलंय.
अनेक धोरणात्मक बाबींवर आपल्याच नेत्यांमध्ये वैचारिक गोंधळ असल्याचंही सोनिया यांनी म्हटलंय. काँग्रेस पक्षात शिस्त आणि एकी आवश्यक आहे, असं सोनिया यांनी म्हटलं.
Discussion about this post