व्हीएसआरएस न्युज पिंपरी पिंपरी चिंचवड शहरावर लादेलेले दिवसाआड पाणी पुरवठ्याचे धोरण हटवण्याबाबत…आयुक्त कडे मागणी.
कोरोना काळात देखील शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरलेले असताना प्रशासनाच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे नागरिकांना पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सणासुदीच्या काळात देखील या धोरणात पालिकेकडून शिथिलता दिली जात नाही.
आंद्रा व भामा आसखेड धरणाच्या पाण्याचे गाजर अजून किती दिवस लोकांना दाखवणार आहात? नागरिकांची दररोज पाणी देण्याची मागणी वाढत आहे. १ नोव्हेंबरपासून शहरात सर्वत्रच टप्पाटप्याने नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी आपण आयुक्त या नात्याने पुढाकार घ्यावा. नागरिकांना नियमित पाणी देऊन दिलासा द्याल, अशी अपेक्षा करतो. अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने पाणी देण्यास भाग पाडेल. याची नोंद घ्यावी.
पिंपरी चिंचवड शहरात तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तांत्रिक कारणे देत गत २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यावेळी शहरवासीयांना केवळ सहा महिने हा त्रास असेल, त्यांनतर नियमित पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. आज जवळपास दोन वर्षांपासून ‘दिवसाआड’ पाणी पुरवठ्याची टांगती तलवार शहरवासीयांच्या मानगुटीवर बसलेली आहे.
मा. राजेश पाटील आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका यांना निवेदन देताना उपस्थित
१) रुपेश पटेकर शहरसचिव
२) अश्विनी बांगर – महीला अध्यक्ष मनसे
३) सिमा बेलापुरकर – शहर सचिव
अध्यक्ष ४) संगीता देशमुख – उपशहर
५) अनिता पांचाळ – उपशहरअध्यक्ष
६) श्रद्धा देशमुख – विद्यार्थी सेना शहर संघटक
Discussion about this post