व्हीएसआरएस न्युज पिंपरी- सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींचे आरक्षण पुर्ववत करावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. यास केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत केंद्र सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने राज्यभर निदर्शने करण्यात आली. या अंतर्गत पिंपरी येथे झालेल्या आंदोलनात सचिन साठे म्हणाले की, माननिय सर्वोच्च न्यायालयात रिट याचिकेवर सुनावणी सुरु असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाने मागणी केली तरी ओबीसी जनगणनेचा डाटा दिला नाही. फडणवीस हे बोलतात एक आणि करतात दुसरेच हे यातून सिध्द झाले आहे.
यावेळी माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, पिंपरी ब्लॉकचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके,. चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, युवक प्रदेश सरचिटणीस मयूर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, चंद्रशेखर जाधव, हिरामण खवळे, लक्ष्मण रुपनर, बाबा बनसोडे, विशाल कसबे, विश्वनाथ खंडाळे, मकरध्वज यादव, किशोर कळसकर, विराज साठे आदी उपस्थित होते.
Discussion about this post