जेजुरी | (व्हीएसआरएस न्यूज) | महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेरायाच्या जेजुरी गड म्हणून तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी १०९.५७ कोटींच्या विकास आराखड्यास अखेर मान्यता मिळाल्यानंतर आता निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान तीन टप्पयात या गडाचा विकास करण्यात येणार आहे. श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र मंदिराचे क्षेत्रफळ १२४० चौरस मीटर आहे. येथे यात्रा उत्सवाच्या वेळी सुमारे दीड ते दोन लाख तर वर्षात सुमारे ४० ते ५० लाख भाविक भेट देतात. या गडाचा विकास तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात वास्तूचे जतन आणि संवर्धन ,पायाभूत सुविधा आणि पर्यटन सोयी सुविधा, जल व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
यामध्ये शास्त्रीय पद्धतीने दगडांची स्वच्छता, अनियोजित व हानिकारक जोडण्या काढणे, खराब झालेल्या चुन्याच्या गेल्याव्याची डागडुजी, पाणी गळती थांबवण्यासाठी विद्युत सोयी, पाणीपुरवठा निचरा व्यवस्था, मल:निसारण आणि त्या पाण्याचा पुनर्वापर योग्य वायुजन प्रणाली, मंदिर परिसरातील धूळ गोळा करण्यासाठी यंत्र, घनकचरा व्यवस्थापन भक्तांसाठी सोयीसुविधा, गर्दीचे व्यवस्थापन ,अपत्यकालीन व्यवस्थापन आणि पर्यावरण पूरक योजना अधिक कमी करण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून ३४९.४५ कोटी रुपये रकमेचा श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखडा एकूण तीन टप्प्यांमध्ये राबविण्याचे नियोजन तयार केले गेले आहे. सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात श्री क्षेत्र जेजुरी गडाच्या विकासाकरिता निधी उपलब्ध करून देण्याचे येत असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले होते.
राज्य सरकारने जेजुरीच्या विकास आराखड्याला मान्यता दिल्यानंतर टेंडर काढण्यात आले आहे .जेजुरीचा टप्पा -टप्प्याने विकास करण्यात येणार आहे. त्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे .हा विकास आराखडा राबविल्यानंतर या शहराची एक वेगळी ओळख तयार होणार आहे.
– किरण इंदलकर, (जिल्हा नियोजन अधिकारी)
जेजुरीची ओळख फक्त धार्मिक नसून महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक केंद्र म्हणून विदृंगत होणार आहे. सांस्कृतिक वारसा स्थळाच्या जतन संवर्धन व व्यवस्थापन साठीचे नियोजन करताना राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर नियमावली आणि मार्गदर्शन तत्त्वांचे पालन करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे ठरणार आहे.
– डॉ. राजेश देशमुख -जिल्हाधिकारी, पुणे
Discussion about this post