व्हीएसआरएस मराठी न्युज –गेल्या दोन तीन दिवसांपासून दिवसा प्रचंड गरमी होत असून, सायंकाळनंतर पाऊस हजेरी लावत आहे. दिवसभर घामेघूम झालेल्या सायंकाळी पुणेकरांना वरूणराजाच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे. परंतु अचानक झालेल्या पावसाने पुणेकरांची चांगली तारांबळ उडाल्याचे दिसून आले आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून पुण्यात ढगाळ वातावरण आहे. दिवसा प्रचंड गरमी होत असून, सायंकाळनंतर पाऊस हजेरी लावत आहे. मंगळवारपासून शहरातील कमाल तापमानाचा आकडा चाळीशीमध्ये पोचला होता. त्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर उन्हाच्या झळया अंगाला झोंबत होत्या. तसेच किमान तापमानही २० अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही झाली. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आकाश भरून आले आणि ढगांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुणेकरांची चांगली तारांबळ उडाली. पुढील पाच दिवस अजून दुपारी आकाश निरभ्र असेल आणि सायंकाळनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार आज्जि पावसाने हजेरी लावली.
आज सकाळापासूनच ढगाळ वातावरण होते. तसेच पावसाची चिन्हेही दिसू लागली होती. अखेर सायंकाळी ७ च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.
Discussion about this post