पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | गुंतवणूक केल्यास शंभर दिवसात ५० लाखांच्या बदल्यात ८० लाख रुपये देण्याची बतावणी करून चार महिलांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुंतवणूकीवर कोणताही परताना न देता त्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात श्रीकांत रामाचार होलेहुन्नर व नितीन विलास कोष्ठी (वय ४२) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत एका २६ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडला आहे. तक्रारदार यांच्यासोबतच इतर तीन महिलांना श्रीमंत बाजार कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास शंभर दिवसात जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांच्याकडून ५० लाख २५ हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. परंतु, शंभर दिवसानंतर परताव्यासह ८० लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज परत न देता त्यांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Discussion about this post