व्हीएसआरएस मराठी न्युज -स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारने ५ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत पुरातत्व विभागांतर्गत येणाऱ्या देशातील सर्व स्मारकांच्या ठिकाणी पर्यटकांना विनामूल्य प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. या ऐतिहासिक घटनेला ७५ वर्ष झाल्याच्या निमित्ताने भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. सरकारने औपचारिक सोहळ्याची सुरुवात १२ मार्च २०२१ रोजी केली. सरकारी सोहळा १५ ऑगस्ट २०२३च्या संध्याकाळी संपणार आहे. या निमित्ताने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची माहिती देण्यासाठी केंद्र सरकार वर्षभरापासून देशभर अनेक उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून ५ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत पुरातत्व विभागांतर्गत येणाऱ्या देशातील सर्व स्मारकांच्या ठिकाणी पर्यटकांना विनामूल्य प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निमित्ताने जास्तीत जास्त पर्यटक भारतातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊन पुन्हा एकदा देशाचा जाज्वल्य इतिहास जाणून आणि समजून घेतील. नव्या पिढीला इतिहास समजून घेण्याची सुवर्णसंधी लाभेल.
Discussion about this post